चारा पिकासाठी पाणी राखीव ठेवा ; पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

चारा पिकासाठी पाणी राखीव ठेवा
पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

वर्धा : बोर प्रकल्पातील पाण्याचे रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी नियोजन करताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांसाठीही पाणी आरक्षण करून ठेवावे . त्याचबरोबर पाणीवाटप संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात , अशा सूचना पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात .

जाहिराती करिता संपर्क 7020602961

जिल्हा परिषद सभागृहात गुरूवारी ( ता . १२ ) पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्पाची कालवे सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली . यावेळी मंत्री केदार बोलत होते . या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार , लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता जे . जी . गवळी , कार्यकारी अभियंता श्री . रहाणे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे , उपवन संरक्षक सुनील शर्मा , जिल्हा अधीक्षक कटुशी अधिकारी उपस्थित होते .
यावर्षी बोर प्रकल्प १०० टक्के भरला असून सिंचनासाठी ९ ८.७७ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे . यातून १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते . याचे नियोजन करताना कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली . कापसावर तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे . यासाठी शासन शेतकऱ्यांना फरतड घेऊ नका आणि एप्रिल , मे पर्यंत कापसाचे उत्पादन लांबवू नये , असे सांगत असतानाही सिंचनासाठी पाणी देताना नोव्हेंबरच्या पुढे कापसाला ५० टक्के पाणी का ठेवण्यात आले ? याबाबत मंत्री केदार यांनी आक्षेप घेतला . यावर्षी पाणी शिल्लक आहे , त्याचा उपयोग गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ करून त्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात . शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढविता येईल याचा विचार करून पिकांचे पद्धतीत बदल करावा . गहू ५० टक्के आणि हरभरा २५ टक्के तसेच इतर पिकासाठी २५ टक्के याप्रमाणे नियोजन करण्यास केदार यांनी सांगितले . त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींची मागणी नाही ना याबाबत खात्री करण्याचे निर्देश दिलेत . त्याचबरोबर प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन यावर चर्चा करताना उद्दिष्टापेक्षा सिंचन कमी होण्याचे कारणांचा अभ्यास करण्यास सांगितले . कालवे , पाटचऱ्या नादुरुस्त असतील तर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिलेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा

Tue Nov 17 , 2020
एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा कन्हान : – भाजप कन्हान शहर च्या वतीने दिवाळी सणा निमित्याने तारसा रोड शाहिद चौक येथे एक दिवा शहिदांचा नावाचा कार्यक्रमांतर्गत भाजपा कन्हान शहराच्या वतीने तारसा रोड शहीद चौक कन्हान येथे शहीद स्मारकावर पुष्प अर्पण व दिप प्रज्वलित करून वीर शहीदांना अभिवादन करण्यात आले .  […]

You May Like

Archives

Categories

Meta