शहरातील घाण व सांडपाणी कन्हान नदी पात्रात सोडणे बंद करून कन्हान नदी प्रदुर्षण मुक्त करा. 

शहरातील घाण व सांडपाणी कन्हान नदी पात्रात सोडणे बंद करून कन्हान नदी प्रदुर्षण मुक्त करा.  

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान-पिपरी चे शिष्टमंडळाने पाण्याविषयी  निवेदन. 

कन्हान : – शहरातील लोकवस्तीची घाण व साडणाणी नाल्या व्दारे कन्हान नदी पात्रात सोडत असुन त्याच नदी पात्रातील ढोल्या व बोरवेल ने पाणी टाकीत घेत बिलीचींग टाकुन कन्हान शहरातील नागरिकांना दुषित पाणी पिण्याकरिता पुरवठा नगरपरिषद करित असल्याने अनेक विषाणुजन्य रोग्या चा फैलाव होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका होत असल्याने शहरातील घाण व सांडपाणी कन्हान नदीत सोडणे बंद करा. किंवा नाल्यावर प्रकीया करूनच स्वच्छ पाणी नदी पात्रात सोडावे. अशी मागणी माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात सृञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षा हयाना निवेदन देऊन कन्हान नदी प्रदुर्षण मुक्त करण्याची मागणी केली आहे. 

          कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत लोकवस्तीची घाण व दुषित सांड पाणी दररोज नांका नं ७, इंदिरानगर, शिवनगर, आनंदनगर, राधाकृष्ण नगर  , तुकाराम नगर, हनुमान नगर, गणेश नगर, रामनगर, लोहिया लेआऊट, स्टे शन रोड व सत्रापुर चे खण्डेवाल नाल्याने कन्हान नदीत सोडल्या जाते व पेप र मिल सिहोरा गावचे सिहोरा नाल्याने कन्हान नदीत सोडल्या जाते. पटेल नगर, विवेकांनंद नगर, जवाहर नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र व महामार्गाचे मटन-मच़्छी मॉर्केट जवळील नाल्याने तसेच रायनगर, सुरेस नगर, अशोक नगर, शिवाजीनगर, धरमनगर व पिपरीच्या लोकवस्तीची घाण व सांडपाणी, मेलेले कुत्रे, डुकरे आणि खुली कोळसा खदानचे दुषित पाणी पिपरी नाल्याने कन्हान नदी पात्रात बिनधास्तपणे सोडत असल्याने कन्हान नदी मोठया प्रमा णात प्रदुषित झाली आहे. याच नदीतुन कन्हान-पिपरीच्या नागरिकांना फक्त बिलीचिंग टाकुन पिण्याकरिता पिण्याचे पाणी पुरवठा नगरपरिषदेने करणे योग्य आहे का ?  नागरिकाना विविध रोगाचे आजार होत असताना नगरपरि षदेने या तिन्ही नाल्यावर प्रकीया करून स्वच्छ पाणी करून कन्हान नदीत सोडण्याची साधी कार्यवाही तरी केली आहे का ? कन्हान नदीला दुषित हो ण्यापासुन तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्या करिता शहरातील घाण व सांडपाणी नाल्यावर प्रकीया करूनच कन्हान नदी पात्रात स्वच्छ पाणी सोडण्याचे आद्य कर्तव्य नगरपरिषदेचे नाही का ?  जेणे करून नदीला प्रदुर्षण मुक्त व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल. 

             कन्हान नदीचे अस्थित्व व शहरातील नागरिकांचे जिवनास धोका निर्माण करण्यास नगरपरिषद प्रशासन प्रमुख म्हणुन आपण दोषी असल्यास नागरिकांनी किती दिवस जिवन मरण्याचा हा अन्याय सहन करावा. कन्हान नदी पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत असल्याने नागरी जिवन जगविण्या करिता कन्हान नदी प्रदुर्षण मुक्त करणे काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे. यास्तव कन्हान नदीच्या मुखा जवळुन १ किमी दुर अंतरावर शहराच्या दुषित पाण्याच्या नाल्यावर प्रकीया करून पाणी स्वच्छ करूनच नदीत सोड ण्यात यावे. अन्यथा आपणास जल जन आंदोलनास सामोरे जावे लागेल. आणि त्या आंदोलना दरम्यान उदभवणा-या सर्व परिस्थितीस आपण सर्वश्री जवाबदार राहाल. अशी मागणीचे निवेदन शिष्टमंडळा व्दारे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयाना माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान-पिपरी चे संस्थापक अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, सचिन साळवी, प्रमोद निमजे,, महेश काकडे, कमलसिंग यादव, मनोहरराव कोल्हे, अजय भोस्कर, अशोक हिंगणकर, प्रविण गोडे, लक्ष्मीकांत पारधी, राजु रेंघे, सतिश भसारकर, बब्रुवान धोडमारे, आंनद सहारे, राजु गणोरकर, धर्मराज चिखले , गोविंद जुनघरे, निशांत जाधव, रूपेश सातपुते, अंबादास खांदारे,  किशोर बावणकुळे, मनिष गोल्लर, निलेश गाढवे, केतन भिवगडे, श्याम मस्के, प्रविण माने, विनोद कोहळे, अमोल डांगे आदी प्रामुख्याने  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. - मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी

Sat Feb 6 , 2021
जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी कन्हान : – त्रिवेणी नदी संगमावरील जुनिकामठी गावाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात शिष्ठमंडळ पारशिवनी नायब तहसिलदार श्री सय्याम यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.        […]

You May Like

Archives

Categories

Meta