हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतक-यांचे की, उद्योगपती चे ? आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना अटक करून नगरपरिषदेत कोंबले

हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतक-यांचे की, उद्योगपती चे ?

आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना अटक करून नगरपरिषदेत कोंबले

कन्हान,ता.२६ डिसेंबर ( सुनिल सरोदे)

     महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरीच्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा, वाघोली, एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतक-याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यानी मध्यरात्री पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला नेऊन नविन नगरपरिषदेत कोंबुन ठेवल्याने संप्तत सरपंचा विद्याताई चिखले सह परिसरातील सरपंच, ग्रां.प.सदस्य, राजकीय मंडळी व शेतक-यांनी दिवसभर कन्हान पोलीस स्टेशन ला ठिय्या आंदोलन करून एक तर शेतक-यांवर किंवा कंपनी वर गुन्हा दाखल करून कोल वाॅसरी बंद करण्याची मागणी केल्याने १७ तासा नंतर कन्हान ठाणेदार विलास काळे यांनी ६८ ची कार्यवाई करून सायंकाळी आंदोलनकारी शेतक-यांना वराडा गावात नेऊन सोडण्यात आले.


पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. कोल वाॅशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. या कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खुली खदान व इतर खदान येथुन येणा-या कोळस्याला वॉश करण्यात येत असल्याने उडणा-या कोळसा धुळी मुळे वायु आणि जल प्रदुषणाने वराडा, वाघोली, एंसबा, घाटरोहणा व गोंडेगाव येथील ६०० एकरावर शेती पिक प्रदुषित होत नुकसान होत आहे. कोळसा धुर मिश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी ही प्रदुषित झाले आहे. धुळकणामुळे गावक-यांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी कोळसा धुळीचे प्रदुषण बंद करण्यास वारंवार संबधित अधिका-यांना तक्रार व आंदोलन केले. तरी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी वॉसरी कंपनी ला मदत करित असल्याचे दिसत आहे. आज उद्या बैठक लावुन विषय मार्गी लावु असे सातत्याने आश्वासन दिले जात होते. कोल वॉसरी च्या धुळीने त्रस्त झालेले शेतकरी व जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरी समोर शुक्रवार (दि.२३) डिसेंबर २०२२ ला ही कोल वॉशरी बंद करण्यासाठी आंदोलन केले. तेव्हा जय जवान जय किसान संघटने चे मा. प्रशांत पवार आणि माजी मंत्री मा. सुनिल बाबु केदार यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक करे मंडळाचे सचिव प्रविण दराडे यांच्या सोबत फोन वर चर्चा करून बेकायदेशीर सुरू असलेली ही कोल वॉशरी ताबडतोब बंद करून शेतक-यां ना न्याय दयावा अन्यथा बेमुदत आंदोलन करू असे सांगण्यात आले. तेव्हा काही वेळ कंपनी बंद ठेऊन शनिवार (दि.२४) ला कंपनीतुन कोळस्याच्या ट्रक भरून काढु लागल्याने शेतक-यांना पुन्हा आंदोलन केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी पोलीसा व्दारे टप्या टप्याने मध्यरात्री १ वाजता आंदोलनकारी शेतक -या पकडुन कन्हान पोलीस स्टेशन नेऊन शेतक-याना नविन नगरपरिषदेत कोबुंन ठेवले.


रविवार (दि.२५) सकाळी संतप्त सरपंचा विद्या चिखले सह चार महिला पोस्टे कन्हान ला गेले असता त्यांनाही ताब्यात घेतल्याने जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, कांग्रेस नेते चंद्रपाल चौकसे, माजी जि.प. अध्यक्ष रश्मिताई बर्वे, पारशिवनी पं.स.सभापती मंगला निंबोने, प.स सदस्य निकीता भारव्दाज, रिता बर्वे, उपसभापती करूणा भोवते, नरेश बर्वे, राजेश ठाकरे, दयाराम भोयर, सिताराम भारव्दाज, देविदास जामदार, देवाजी शेळकी, बबलु बर्वे, आत्माराम उकुंडे, प्रेम रोडेकर, योगेश वाडीभस्मे, उत्तम सुळके, किशोर बेहुणे, अशोक पाटील, नरेश ढोणे, मारोती नागमोते सह बखारी, साटक, डुमरी, गोंडेगांव, जुनी कामठी, यसंबा, निलज, नांदगांव चे सरपंच सह बहु संख्येने छोटे मुले, महिला, पुरुष शेतक-यांनी सकाळी पासुन पोलीस स्टेशन चा घेराव करून शेतक-याना पकडुन आणुन रात्री पासुन आंतकवादया सारखे नविन नगर परिषद मध्ये कुलुप लावुन कोंबुन ठेवले का ? ते कुणाच्या तक्रारीने कुठल्या कायद्याने हे लेखी स्वरूपात देण्यात यावे. यावेळी स्थानिय जनप्रतिनिधी व राजकीय मंडळीने येऊन शेतक-याच्या पाठीशी उभे राहिल्याने १७ तासानंतर उशीरा सायंकाळी ६ वाजता आंदोलक शेतक-यांना पोलीस वाहनाने वराडा येथे नेऊन सोडण्यात आले.

   रामटेक क्षेत्राचे आमदार, खासदार यांनी हजेरी लावली नाही. पोलीस प्रशानाने कंम्पनी ला कडक पोलीस बंदोबस्त लावुन शेतक-यांचे आंदोलन दडपण्यास सहकार्य करित शेतक-यांना ताब्यात घेऊन कोंबुन ठेऊन कंम्पनीस चोरीने कोळसा भरून काढण्यास मदत केल्याचा आरोप शेतक-यांनी करित हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेत क-यांचे की, उद्योगपती चे ? असा प्रश्न उपस्थितानी केला.

   गुप्ता कोल वॉशरी च्या कोळसा धुळीमुळे प्रदुषित पाण्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने जिलाधिकारी मा.डॉ. विपिन इटनकर व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यासह मागिल महिन्यात कंम्पनी व शेतक-यासह भेट देऊन समस्या चे निरिक्षण केले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोळसा वॉशरी च्या अधिका-यास आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कंम्पनी व्दारे दुर्लक्षित करित असल्याने शेती पिकाचे व गावक-यांचे उडण्या-या कोळसा धुळी अतोनात नुकसान दिवसेंदिवस  होतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी

Mon Dec 26 , 2022
कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी कन्हान,ता.२६ डिसेंबर      शहर विकास मंच द्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.        कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास […]

You May Like

Archives

Categories

Meta