नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा
” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेसची मागणी
कन्हान, ता.२७ फेब्रुवारी
नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन मशाल मोर्चा काढण्यात आला.
अखिल भारतीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात व माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात
” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातून कन्हान येथे सायंकाळी तारसा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत मशाल मोर्चा काढुन केंद्र व राज्य सरकार ला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात रोजगार दो, न्याय दो अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
Post Views: 624
Tue Feb 27 , 2024
शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी (को.ख) जनजागृती संवाद कन्हान, ता.२७ फेब्रुवारी पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जन जागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहभागी होऊन सहकार्य करण्याची हमी दिली. आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन […]