नवनिर्मित कन्हान नदी पुलावर साचले पावसाचे पाणी , बांधकामाची पोल खोल

नवनिर्मित कन्हान नदी पुलावर साचले पावसाचे पाणी , बांधकामाची पोल खोल

कन्हान,ता.२६ जून

 ‌ २०१४ नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊ न फक्त दहा महिने झाले. या दहा महिन्यात पुलावर खुप वेळा मोठ-मोठे गड्डे पडुन सळाखी बाहेर दिसुन आले, रस्त्याचा मधात गॅप दिसुन आली आणि आता पुलावर पावसाचे पाणी साचल्याने पुन्हा एकदा पुलाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहे ़

        नवनिर्मित कन्हान नदी पुलाचे भूमिपुजन २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री फर्नांडिस यांच्या हस्ते आणि तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पुल तीन वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्यानंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोळीने पुलाचे कार्य संथगतीने सुरु होते .

या पुलाचे बांधकाम ताराकुंडे कंपनी द्वारे करण्यात आले. पुलाच्या बांधकामाला जवळपास आठ वर्ष लागली. (दि.१) सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते, विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने ,आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हा पासुन पुलावरुन दिवस रात्र वाहनांची रहदारी सुरु झाली. दरम्यान मध्यंतरी पुलावर खुप वेळा मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागला. या गड्याने निर्दोष वाहन चालक वाहनासह पडुन गंभीर जख्मी होऊन अपंगत्व आले. या संर्दभात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये बातमी प्रकाशित होताच गड्डे बुझवुन फक्त लीपापोती करण्यात आल्याने आज ही पुलावर खुप ठिकाणी रस्त्यावर गड्डे पडले आहे. मध्यतंरी नवनिर्मित पुलावर रस्त्याचा मधात गॅप दिसुन आली आणि आता पुलावर शहरात दोन दिवस झालेल्या पावसाचे पाणी रस्त्याचा किणारी साचले. एवढेच नाही तर पुलावर सकाळ सायंकाळी फिरण्याऱ्या नागरिकां च्या पादचारी जागेवर सुद्धा पावचाचे पाणी साचले आहे. पुलाचा समस्या सातत्याने उघडकीस येत अस ल्याने तारकुंड कंपनी द्वारे बांधण्यात आलेल्या पुलाचा बांधकामावर प्रश्न निर्माण झाले असुन अधिका-यानी जनतेच्या पैशाची खेळ केला काय ? हा पुल किती काळ टिकणार ? कोसळला तर जिम्मेदार कौन ? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे पुला वर गड्डे आणि आता पावचाचे पाणी साचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. करिता अधिका-या नी व प्रशासनाने तात्काळ लक्ष केंन्द्रीत करुन पाण्या च्या निकासी बाबत तोडगा काढण्यात यावा. अशी मागणी नागरिक करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश 

Thu Jun 29 , 2023
कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश कन्हान,ता.२९ जुन     पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रज्जा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवानी बकरी ईद उत्साहाने साजरी करण्यात आली .           गुरूवार (दि.२९) जुन ला मुस्लिम समाज बांधवानी बकरी ईद हा मोठा सण म्हणुन साजरा केला जातो. […]

You May Like

Archives

Categories

Meta