कोरोना मृत कुटुंबांना शासकीय योजनेत समाविष्ट करून लाभ मिळण्याची मागणी
#) सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कन्हान : – राज्यात कोरोना थैमान पसरल्याने अनेक किती तरी सामान्य लोकांचे मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुं बावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने शहराती ल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिलदार वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन कोरोना मृत कुटुंबांना शासकीय योजनेत समाविष्ट करून लाभ मिळण्याची मागणी केली आहे.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरा त कोरोना चा प्रार्दुभाव अतिवेगाने वाढल्याने अनेक सामान्य नागरिकांचे कोरोना आजाराने मुत्यु झाल्याने त्यांचा कुंटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने दैनंदिन उपजिविका चालविण्याकरीता काम करने अत्यंत गरजेचे झाले असुन ते अश्यातच कोरोना आजाराचा विळाख्यात अडकुण त्यांनी आपल्या औषधा उपचाराकरिता संपुर्ण आयुष्यात कमावलेल्या जमापुंजी (रोख रक्कम) आरोग्यवर लावली पण ते ही कामात न येता त्यांना आपला जिव गमवल्यानंतर त्यांच्या वारसदारांवर दुखाचे डोंगर कोसळल्याने आर्थि क परिस्थिती गंभीर स्वरुपाची झाली आहे. अश्या कुटुं बांना उदारनिर्वाह व जगण्याकरिता वणवण भटकाव लागत असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिलदार श्री वरुणकुमार सहारे यांच्या मार्फत मुख्य मंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन तात्काळ कोरोना काळात मृत झालेल्या कुटुंबाना या संकटातुन बाहेर काढण्याकरिता व त्यांचा वर्तमान, भविष्याकरिता त्यांना विविध शासकीय योजनेत समा विष्ट करून शासकीय योजनाचा लाभ देण्यात यावा तसेच शासकीय आर्थिक मदत ही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजि क कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, राजेश गजभिये, दिपक तिवाडे, मिलिंद मेश्राम, प्रशांत गजभिये, नरेश पाटील, सिद्धार्थ सुखदेव, विपीन गोंडाने, चंदन मेश्राम, कुंदन रामगुंडे, भोला भोयर, आदेश मेंढेकर आदीने प्रामुख्याने उपस्थित होते.